‘दिल्लीत राजकीय भूकंपाची चाहूल?’ धर्मेंद्र प्रधानांच्या एक्झिटनंतर फडणवीस-शिंदेंना तातडीचा दिल्लीचा निरोप; अमित शाहांच्या बैठकीत काय शिजतंय?

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात उसळलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्यानंतर आता राष्ट्रीय आणि महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात लाखो विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर ही मागणी मान्य झाल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर काही तासांतच राजकीय हालचालींना अभूतपूर्व वेग आला.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची माहिती समोर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीहून तातडीचा निरोप आल्याची माहिती समोर आली. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दूरध्वनीनंतर फडणवीस यांनी कोणताही विलंब न करता दिल्लीकडे प्रस्थान केले. त्यांच्या या अचानक झालेल्या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

याच दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे आणि अमित शाह यांच्यात महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या बैठकीत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीपासून आगामी रणनीतीपर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते, अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.


धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारमध्ये पुढील जबाबदाऱ्या, शिक्षण मंत्रालयातील बदल तसेच राज्यातील सत्ताधारी नेतृत्वाशी संबंधित काही महत्त्वाच्या निर्णयांवरही चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे फडणवीस आणि शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याकडे केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
दिल्लीला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्या राजकीय प्रवासाबाबत भाष्य केले. “पद किती काळ टिकते यापेक्षा त्या पदावर राहून जनतेसाठी किती काम केले, हे अधिक महत्त्वाचे आहे. पांडुरंगाची कृपा असेपर्यंत मी राज्याच्या विकासासाठी काम करत राहीन,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यालाही राजकीय संदर्भात महत्त्व दिले जात आहे.
दरम्यान, जंतर-मंतरवरील आंदोलनामुळे निर्माण झालेला दबाव, त्यानंतर झालेला केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा आणि लगेचच महाराष्ट्रातील दोन वरिष्ठ नेत्यांची दिल्लीकडे धाव या घटनांमुळे राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले आहे. आता अमित शाह यांच्या बैठकीत नेमके कोणते निर्णय होतात, महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते नवे संकेत मिळतात आणि पुढील काही दिवसांत आणखी कोणते बदल घडतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.