शिंदे गटात मोठा राजकीय भूकंप?; तब्बल ४० आमदार फुटणार असल्याचा बड्या नेत्याचा दावा, पुन्हा बदलणार समीकरणं?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. शिवसेनेतील फूट, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील विभाजन आणि सत्तांतरामुळे राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली. आता पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बारामती येथे बोलताना शिंदे गटातील अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. “काही पक्षनिष्ठ आमदार वगळता अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. २०२९ च्या निवडणुकांपूर्वी सर्व काही स्पष्ट होईल,” असे त्यांनी म्हटले.
रोहित पवार यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वीही राज्यात अनपेक्षित राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्याने त्यांच्या दाव्याकडे गंभीरतेने पाहिले जात आहे.

यावेळी त्यांनी इतर राजकीय मुद्द्यांवरही भाष्य केले. खासगी विमान दुर्घटनांबाबत कठोर नियमांची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच काही महत्त्वाच्या राजकीय चर्चाही अंतिम टप्प्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला.
