सावधान ! देशात एका दिवसात 10,112 कोरोना रुग्ण, तर 29 जणांचा मृत्यू


मुंबई : अजूनही देशात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे. काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा एकदा डोकेदुखी वाढली आहे. काल कोरोनाचे 10,112 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर आदल्या दिवशी 12000 हून अधिक कोरोना संसर्गाची नोंद झाली होती.

या दृष्टिकोनातून पाहिले तर आज कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. भारतातील सक्रिय केसलोड सध्या 67,806 आहे, तर सक्रिय प्रकरणे 0.15% आहेत. सध्या कोरोनामधून बरे होण्याचा दर सध्या 98.66% आहे. गेल्या 24 तासात 9,833 लोक कोरोनामधून बरे झाले आहेत, त्यानंतर कोरोनामधून बरे झालेल्यांची एकूण संख्या 4,42,92,854 झाली आहे. सध्या दैनिक सकारात्मकता दर (7.03%) आहे तर साप्ताहिक सकारात्मकता दर (5.43%) आहे.
गेल्या 24 तासात 1,43,899 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण 92.54 कोटी चाचण्या झाल्या आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत एकूण 220.66 कोटी लसीचे डोस (95.21 कोटी दुसरा डोस आणि 22.87 कोटी प्रतिबंधात्मक डोस) देण्यात आले आहेत. तसेच काल 29 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या ही सरासरी 10 हजाराने वाढत आहे. एप्रिल महिन्यात आतापर्यंत 1 लाख 69 हजार कोरोना रुग्ण सापडले. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.
देशात गेल्या 24 तासांत 545 रुग्ण सापडले तर दोघांचा मृत्यू झाला. आज 655 जण कोरोनामुक्त झाले तर दिवसभरात 8 हजार 278 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार 55 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबई आज 141 रुग्ण सापडले तर एका तरुणाचा मृत्यू झाला.