शेतकऱ्यांनो गाई खरेदी करताना सावधान! पंजाब हरियाणा मधून आणलेल्या गाईचा उन्हाळ्यामुळे होतोय मृत्यू…!


पुणे : सध्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. यामुळे याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. पंजाब व हरियाणाच्या गाई आपल्या महाराष्ट्रातील गाईच्या दुधापेक्षा किमान दहा लिटरने जास्त दूध देणार्‍या असतात.

यामध्ये पंजाब, हरियाणा, बेंगलोरच्या गाई महाराष्ट्रीयन गायीपेक्षा १५ ते २० लिटर दूध जास्त देतात. त्यामुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रीयन गाईकडे पाठ फिरवली असून पंजाब हरियाणा बेंगलोरच्या गाई खरेदी करत आहेत.

दरम्यान, एक गाई खरेदी करायची म्हटलं की दीड ते दोन लाख रुपयांची तयारी ठेवावी लागते. त्यानंतर वाहतुकीसाठी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च होतो. त्यानंतर ती गायी गोठ्यामध्ये आणली जाते. मात्र गेल्या पंधरा दिवसांमध्ये पंजाब, हरियाणा आणि बेंगलोर या राज्यांमधून आणलेल्या गाई मृत्युमुखी पडत आहेत. सोनेवाडी डाऊच खुर्द येथे मोठ्या प्रमाणात गाई मृत्युमुखी पडल्या आहेत. या सर्व घटनेमुळे शेतकरी मात्र चिंतेत आहे.

 

त्यामुळे शेतकऱ्यांनी गाई खरेदी करताना सावधानता बाळगावी शक्यतो उन्हाळ्यामध्ये गाई खरेदी करताना थोडं थांबावे. पावसाळा व हिवाळ्यात वातावरण थंड असतं अशावेळी गाई खरेदी करावी. उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे उष्ण वातावरण असल्यामुळे गाईला वातावरण सहन होत नाही. त्यामुळे गाईचे मृत्यूचे प्रमाण हे वाढत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी व दुग्ध व्यवसायकांनी काळजी घ्यावी.

 

 

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!