रानडुक्कर आडवे आल्याने कारचा भीषण अपघात! पोलीस कर्मचाऱ्यासह कुटूंबातील चार ठार


वर्धा : येथील समुद्रपूर तालुक्यातील मांडगावममध्ये भीषण अपघात झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. आपल्या कुटुंबासह वर्ध्याकडे कारने येत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या गाडीला हा अपघात झाला. यावेळी मोठी गर्दी झाली होती. या अपघातात पोलिस कर्मचाऱ्याचे संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडले.

पोलिस कुटुंब मांडगाव येथून वर्ध्याकडे येत असताना कारची टँकरला धडक बसली. वर्ध्याच्या तरोडानजीक हा अपघात झाला. पती-पत्नी आणि दोन मुलं असे चौघे जण अपघातात ठार झाले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. रस्त्यावर रानडुक्कर आडवे आल्याने तरोडा गावाजवळ कार अनियंत्रित झाली.

त्यामुळे समोरून येणाऱ्या डिझेल टँकरला या गाडीची टक्कर झाली आहे. दुर्दैवाने यात तीन वर्षांचा मुलगा तर पाच वर्षांच्या मुलीचाही मृतकांमध्ये समावेश आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

या अपघातात पोलिस कर्मचारी प्रशांत वैद्य यांच्या पत्नी प्रियंका आणि त्यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर प्रशांत वैद्य व मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची मोठी घटना घडली आहे. या घटनेत गाडीचे देखील पूर्ण नुकसान झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!