वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी दोन मुलांच्यात तुफान राडा!! पर्याय काढला मृतदेहाचे दोन तुकडे करा, घटनेने सगळेच सुन्न….


मध्य प्रदेश : वडिलांच्या अंत्यसंस्कारावरून दोन मुलांमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मध्य प्रदेशातून समोर आली आहे. दोन्ही मुलांना वडिलांवर अंत्यसंस्कार करायचे होते. दोघांचेही आपापले दावे होते.

दरम्यान, वडिलांचा मृतदेह तसाच पडून राहिला. अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी झाली होती. मात्र चितेला अग्नी कोणी द्यायचा यावरून वाद निर्माण झाला व ग्रामस्थ व नातेवाईक ताटकळत उभे राहिले.

नेमकं काय घडलं?

टीकमगड जिल्ह्यातील जटारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामपंचायत ताल लिधौरा येथे ८५ वर्षीय ध्यानी सिंह घोष यांचा मृत्यू झाला. दरम्यान ध्यानीसिंग यांचा धाकटा मुलगा दामोदरसिंग याने आपल्या वडिलांची काळजी घेतली होती. त्याने वडिलांची सेवा केली होती. धाकट्या मुलाच्या घरातच वडिलांचा मृत्यू झाला होती.

त्यामुळेच त्याने वडिलांवर अंत्यसंस्कार करायची इच्छा व्यक्त करत अंत्यविधीची तयारीही केली होती. ध्यानी सिंग यांचा मोठा मुलगा आपल्या कुटुंबासह तेथे पोहोचला. मोठा मुलगा असल्याने वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार माझाच असल्याचे त्याने सांगितले.

दरम्यान, यावर धाकट्या मुलाने म्हटले की, मी वडिलांची सेवा केली आहे, त्यामुळे मीच अंत्यसंस्कार करणार असल्याचे सांगितले. मात्र मोठा मुलगा आपल्या दाव्यावर ठाम होता. थोरल्या मुलाने मृतदेहाचे दोन तुकडे करण्याची भाषा केली. त्याने धाकट्या भावाला मृतदेहाचे दोन तुकडे करून प्रत्येक तुकड्यावर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. यावेळी वडिलांचा मृतदेह तब्बल ५ तास पडून होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!