राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट, ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता…!!


मुंबई : राज्यात कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. हिवाळा गेल्यानंतर आता उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागत आहे. अशातच आता राज्यातील काही भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा संकट निर्माण झाला आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही तासात राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस सुरु असल्याने शेतकऱ्यांना मोठा नुकसान सहन करावा लागत आहे.

या भागात होणार पाऊस…

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. गेल्या ८ दिवसांपासून मराठवाड्यात अवकाळी पाऊस सुरु असल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. यातच आता पुन्हा एकदा मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे.

विभागानुसार पुढील २४ तासात बीड, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूरसह इतर काही भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामुळे या भागांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. तर पुढील ४८ तासांसाठी पश्चिम महाराष्ट्रा आणि विदर्भासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!