Parbhani News : रुमालाने घात केला! सोयाबीन काढत असतांनाच शेतकऱ्याचा जीव गेला, नेमकं काय घडलं?


Parbhani News : सोयाबीन काढत असतांनाच शेतकऱ्याचा जीव गेला आहे. एक छोटासा रुमाल या शेतकऱ्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे. परभणी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. Parbhani News

बालासाहेब साठे अस मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 

परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील नैकोटा येथे हार्वेस्टींग मशीन मधून सोयाबीन काढत असतांना विचित्र घटना घडली. गळ्यातला रुमाल हार्वेस्टींग मशीनच्या पंख्यात अडकून शेतकरी बेशुद्ध झाला. गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. Parbhani News

मृत्यू कुणाला कधी कुठे कसा गाठेल याचा काही नेम नाही. ज्या शेतात घाम गाळला तिथेच या शेतकऱ्याने प्राण सोडले आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!