जालना घटनेवरून मराठा समाज आक्रमक, आज बारामती कडकडीत बंद; शहरात निघणार मोर्चा…

बारामती : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेमुळे राज्यभरातील वातावरण देखील चांगलेच तापले आहे.
अनेक ठिकाणी याचा तीव्र निषेध देखील करण्यात आला आहे. सरकारी बस पेटवून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज (ता. ४) बारामती बंदची हाक देण्यात आली आहे. ज्यामध्ये बारामती शहर आणि काही ग्रामीण भागात आज बंद पाळला जाणार आहे. जालना येथील घटनेनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. आता पुन्हा एकदा मराठा आरक्षाणाचा मुद्दा चर्चेत आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, कसबा- गुणवाडी चौक- गांधी चौक- भिवगण चौक असा मोर्चाचा मार्ग असणार आहे. त्यानंतर सभा आणि निवेदन होईल.
यासाठी राजकीय नेते देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर संपूर्ण मराठा समाजाने जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावे असे देखील आव्हान करण्यात येत आहे.
दरम्यान, जालना, नांदेड, हिंगोली, सातारा, सांगली, सोलापूर आणि अमरावतीमधल्या दर्यापूरमध्ये बंदचे आवाहन करण्यात आले आहे. व्यापारी आणि दुकानदारांनी बंदला प्रतिसाद देण्याचे आवाहन मराठा आंदोलकांनी केली आ