बारामतीत इंडो – पॅसिफिक प्रदेशातील पिकांच्या तणाव व्यवस्थापन, एआय आधारित तंत्रज्ञान कार्यशाळा, शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती….


बारामती : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे आयोजित इंडो – पॅसिफिक प्रदेशातील पिकांच्या तणाव व्यवस्थापन आणि फिनोटायपिंगसाठी एआय आधारित तंत्रज्ञान कार्यशाळेच्या शुभारंभ झाला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.

कृषी विज्ञान केंद्र बारामती, अटल इनक्यूबेशन सेंटर बारामती, आय आय टी मुंबईचे ग्रामीण तंत्रज्ञान केंद्र, टेक्नोलाॅजी इनोव्हेशन हब, विद्या प्रतिष्ठानचे कृत्रिम बुद्धिमत्ता व नवोपक्रम केंद्र आणि वाॅशिंग्टन स्टेट युनिवर्सिटी यूएसए यांच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तंत्रज्ञान हे आपल्या आयुष्यात आजघडीला खुप महत्वाचे झाले आहे.

तसेच चॅट जीपीटीसारख्या टूल्सद्वारे आपण कोणतीही माहिती सहज मिळवू शकतो. बारामती आणि वाॅशिंग्टन यांच्यात काय साम्य आहे, याचे चॅट जीपीटीने दिलेले उत्तर सुप्रिया सुळे यांनी सभागृहाला सांगितले. यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी विज्ञानाला महत्व दिल्याचे आवर्जून सांगितले. यावेळी आपणही तंत्रज्ञानाप्रमाणे बदलले पाहिजे, असे आवर्जून सांगितले.

संशोधन, विस्तार, शिक्षण, कार्यरत राहणे हे बारामतीचे वैशिष्ट्य असल्याचे सांगून मागील सहा दशके या पद्धतीने काम होत असल्याचे सांगितले. यावेळी जर बाजाराची स्थिती, हवामान याची माहिती जर व्यवस्थितपणे शेतकऱ्यांना मिळाली नाही तर काय होईल? असा प्रश्न उपस्थित करत यावर काम होणे गरजेचे असल्याचे मत मांडले.

यावेळी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर व्हायला हवा पण त्यावर आपण पूर्णपणे विसंबून रहायला नको, असेही आवर्जून सांगितले. यावेळी लहान शेतकऱ्यांनाही याचा वापर करता यावा, यावर काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच या कार्यशाळेत सर्व गोष्टींवर चर्चा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन राजेंद्रदादा पवार, संशोधक, प्राध्यापक, संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!