मोठी बातमी! ७१ लाख ‘लाडक्या बहिणींना’ १५०० रुपयांचा लाभ थांबणार? तुमचं नावही आहे का यादीत—आता लगेच तपासा..

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

तसेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थींच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. ७१ लाख बहिणींच्या चिंतेची आहे. E-KYC प्रक्रियेनंतर पडताळणीमध्ये ७१ लाख महिला अपात्र ठरल्या असून, त्यांची नावे लाभार्थी यादीतून कापली गेली आहेत.
जर तुमच्या खात्यावर फेब्रुवारी महिन्याचे हप्ते आले नसतील, तर तुमचं नावही या ‘बाद’ झालेल्या यादीत असण्याची शक्यता आहे. योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पैसे पोहोचावेत यासाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केलं होतं.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी वारंवार सूचना देऊनही अनेक महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नव्हती. ज्यांनी प्रक्रिया केली, त्यांच्या अर्जात तांत्रिक चुका निघाल्या. आधार कार्ड लिंक नसणे, बँक खात्याशी मोबाईल नंबर जोडलेला नसणे किंवा माहितीमध्ये तफावत असणे, अशा कारणांमुळे तब्बल ७१ लाख महिलांना या योजनेतून तूर्तास बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
दरम्यान, या ७१ लाख महिलांना आपले अर्ज सुधारण्यासाठी आणि ई-केवायसीमधील त्रुटी दूर करण्यासाठी सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंतची मुदतवाढ दिली होती. आज या मुदतीचा शेवटचा दिवस आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, आज रात्रीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे ज्या महिलांनी अजूनही आपले प्रोफाईल अपडेट केलेले नाही, त्यांच्यासाठी ही ‘आर या पार’ची लढाई आहे.
राज्यभरातील पात्र महिलांच्या खात्यावर फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये जमा झाले आहेत. जर तुमच्या ओळखीतल्या कोणाला किंवा तुम्हाला हे पैसे मिळाले नसतील, तर समजावं की तुमच्या अर्जात काहीतरी घोळ आहे.
आज दिवसभरात जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन किंवा मोबाईल अॅपवरून आपले ई-केवायसी ‘रिचेक’ करणं गरजेचं आहे. अन्यथा, यापुढचे सर्व हप्ते कायमचे बंद होऊ शकतात. सरकारने दिलेली ही शेवटची संधी हुकली, तर ७१ लाखांच्या या महाकाय आकड्यातून तुमचं नाव बाहेर काढणं अशक्य होईल.