पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी हटणार ? भारत सरकारने घेतला मोठा निर्णय…!

नवी दिल्ली : भारत सरकारने उरी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती. यानंतर अनेक राजकारण पेटले होते.
उरी हल्ल्यापूर्वी अनेक पाकिस्तानी अभिनेते, अभिनेत्री आणि गायक बॉलिवूडमध्ये काम करत होते. आता शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन’ चित्रपट महोत्सव नुकताच सुरु झाला आहे.
यामुळे सध्या सर्वत्र चित्रपट महोत्सवाची चर्चा सुरु आहे. याबाबत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाषण केलं. अन्य देशांसोबतच पाकिस्तान देशाला देखील चित्रपट महोत्सवासाठी आमंत्रण पाठवण्यात आल आहे.
पण चित्रपट महोत्सवात पाकिस्तानातील कलाकारांनी उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला नाही. ‘शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन’ चित्रपट महोत्सवात अनेक कलाकार उपस्थित राहतात.
जेव्हा कोणत्याही मल्टीनॅशनल टुर्नामेंटचं आयोजन केलं जातं, तेव्हा आम्ही त्या सर्व देशांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे, जे या जगाचा भाग आहेत. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.