आता गृहकर्ज स्वस्त होणार? आरबीआयकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता! जाणून घ्या…


नवी दिल्ली : देशात सध्या मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. या महागाईमुळे सर्वसामान्य घर खरेदीदारांसाठी स्वप्नातलं घर घेणं अधिक कठीण झालं आहे. भारतातील घरांच्या किमती 2025 मध्ये झपाट्याने वाढल्या आहेत. महागड्या घरांसाठी विक्रीत वाढ दिसत असली तरी, कमी बजेटच्या घरांची मागणी घटली आहे.

देशभरातील प्रमुख शहरांमध्ये, दिल्ली, मुंबई आणि कोलकातामध्ये घरांच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईत तो 6% ने वाढून 8,360 रुपये झाला आहे. कोलकातामध्ये 9% वाढीसह 3,947 रुपये प्रति चौरस फूट इतका दर झाला आहे. 50 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांची विक्री 9% ने घसरून 21,000 युनिट्सवर आली आहे. यामुळे हा मोठा बदल असल्याचे सांगितले जात आहे.

आरबीआयने रेपो रेट 0.25% ने कमी करून 6.25% केला होता. आता पुन्हा 7 ते 9 एप्रिलदरम्यान होणाऱ्या पतधोरण बैठकीत आणखी व्याजदर कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिक आणि तज्ज्ञ यावेळी मोठ्या अपेक्षेने आहेत. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत मोठ्या प्रमाणावर बदल आपल्याला बघायला मिळणार आहेत.

यामध्ये मध्यमवर्गीयांना आणि पहिल्यांदाच घर घेणाऱ्या ग्राहकांना याचा थेट फायदा होऊ शकतो. व्याजदर कपात झाल्यास गृहकर्ज परवडणारे होईल आणि घर खरेदी सोपी होईल. जर रेपो दर 6% पर्यंत खाली आला आणि बँकांनी लवकर कारवाई केली, तर गृहकर्जाची मागणी वाढू शकते. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, 2025 च्या सुरुवातीला घरांची विक्री आणि पुरवठा कमी झाला आहे. गृहकर्ज स्वस्त झाल्यास विक्रीत मोठी वाढ होऊ शकते. सध्याच्या घडीला महागाई नियंत्रणात आहे. त्यामुळे आता आरबीआयने आर्थिक वृद्धीवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!