मोठी बातमी! अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? शिंदे गटाच्या नेत्याने सगळंच सांगितलं, केलं मोठं वक्तव्य…


मुंबई : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. खुद्द शरद पवार गटातील एक गट अजित पवार यांच्यासोबत जाण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे या चर्चांना अधिकच जोर आला आहे.

या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादीतील फूट ही कौटुंबिक फूट आहे. त्यामुळे ते उद्या एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं विधानच संजय शिरसाट यांनी केलं आहे.

त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना अधिकच बळ मिळालं आहे. संजय शिरसाट हे मीडियाशी संवाद साधत होते. उबाठा गटाने दोन्ही काँग्रेससोबत केलेली युती चुकीची होती. हे आम्ही आधीच सांगत होतो आणि आता त्याचा प्रत्यय आता त्यांना येत आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले तुमच्या सोबत राहणार नाही हे वारंवार आम्ही त्यांना सांगत होतो. आता जसेजसे त्यांचं भविष्य अंधारमय होत चालले आहे तसे आता ते टीका करत आहेत. राष्ट्रवादीमधील फूट ही कौटुंबिक फूट मानली जाते, पण ते उद्या एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहे. त्यांनी एकत्र येणे काही नवीन नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस देखील उबाठा सोबत कुठे आहे? गेल्या चार महिन्यात काँग्रेससोबत यांची कोणती बैठक झाली? कधी यांनी त्यांना फोन केला किंवा त्यांनी यांना फोन केला? पुढील काळात उबाठा गटाला एकटंच चालावे लागणार आहे. आता एकटाच प्रवास त्यांना महागात पडणार आहे.

ते हिंदुत्वाशी एकरूप राहिले नाही, महाविकास आघाडीत जाऊन देखील महाविकास आघाडी एकत्र ठेवू शकले नाही. त्यांची आता घर का न घाट का अशी अवस्था झाली आहे, अशी टीका शिरसाट यांनी ठाकरे गटावर केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!