पीएम किसानचा 20 वा हप्ता कधी मिळणार? अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आली महत्वाची माहिती समोर….

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता कधी मिळणार याबाबत आता माहिती समोर आली आहे. याबाबत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.

प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांच्या लहान-मोठ्या शेतीशी संबंधित गरजांसाठी सहाय्य करणे हा आहे. केंद्र सरकार हा 20 वा हप्ता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू शकते.

याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र लवकरच याबाबत माहिती समोर येईल. सध्या देशभरातील कोट्यवधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. आत्तापर्यंत या योजनेचे 19 हप्ते जमा करण्यात आले आहेत. 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये जारी केला होता.

या हप्त्याला चार महिने उलटून गेले असल्याने शेतकरी आता 20व्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नसेल तर त्यांना हप्ता मिळणार नाही. यामुळे काही कामे राहिली असतील तर ती तुम्हाला लवकरच पूर्ण करावी लागणार आहेत.
दरम्यान, देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांचा प्रमुख उदरनिर्वाहाचा स्त्रोत शेती असला तरी, आजही अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या खूपच मागे आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे. यामध्ये ही योजना लोकप्रिय आहे.
