पुरंदर विमानतळाला मूहूर्त कधी? काय आहेत अडचणी? जाणून घ्या…


उरुळी कांचन : सध्या लोहगाव येथील विमानतळावर ताण येत असून, पुरंदर विमानतळ तातडीने मार्गी लागणे आवश्यक आहे. यामुळे हे विमानतळ कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते रखडले आहे.

हे विमानतळ सध्या खूप महत्वाचे आहे. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनाची अधिसूचना प्रसिद्ध झालेली नाही. पुढच्या पंधरा दिवसांत अधिसूचना प्रसिद्ध होईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी तारीख पे तारीख मिळत आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने विमानतळ पुरंदरमधील जुन्या जागेवरच करण्याचा निर्णय घेतला तसेच या ठिकाणी बहुउद्देशीय माल वाहतूक व साठवणूक केंद्र प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे भूसंपादन एमआयडीसीच्या जमीन अधिग्रहण कायद्यानुसार केले जाणार आहे. यामुळे याला विरोध होणार का हे बघणे महत्वाचे आहे.

त्यानुसार एमएडीसी आणि जिल्हा प्रशासनाकडून प्रकल्पाबाबत करण्यात आलेल्या जमीन मोजणीपासून नकाशे, इतर सर्व कागदोपत्री अहवाल एमआयडीसीकडे पाठविले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

त्यात काही समितीने त्रुटी काढल्या आहेत. त्या दुरुस्त करून पुन्हा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत . यामुळे सध्या पुरंदर विमानतळ हे लालफितीत अडकल्याचे दिसून येत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

राज्य शासनाने नगरविकास विभागाच्या आदेशानुसार 2018 मध्ये एमएडीसीमार्फत विमानतळ विकास हेतू प्रकल्पाची अधिसूचना काढली. नगर विकास विभागाच्या निर्देशानुसार एमएडीसीने 2018 मध्ये काढलेली अधिसूचना अद्याप रद्द केलेली नाही. ही अधिसूचना रद्द केल्याशिवाय नवी अधिसूचना काढता येत नाही. अशी अडचण झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!