महिलांनो मुलांच्या संगोपनाबाबत पालकांनी काय टिप्स कराव्यात ?

उरुळी कांचन : मुलांना वाढवणं म्हणजे पालकांचं पुन्हा एकदा घडणं असतं, चांगल्या-वाईटाला पुन्हा नव्या दृष्टिकोनातून, संदर्भातून बघण्यासारखं असतं. मुलांच्या नजरेत आपले आई-बाबा खरंच खूप चांगले, खरे आहेत, हे बिंबण्यासाठी पालकांनाही काही घडे गिरविण्याची आवश्यकता असते. त्याविषयी हे कानमंत्र
मुलांचा आत्मसन्मान अगदी वर्ष सव्वा वर्षापासून मोठ्या व्यक्तीसारखाच असतो. त्यामुळे त्यांच्याशी वागताना गंमत करू, या अॅप्रोचने त्यांची चेष्टा केलीत तर त्यांना तो टोन कळतो, ती दुखावतात. असं पुन्हा पुन्हा झालं तर चिडचिडी होतात, मारायला अंगावर येतात. मुलांची चेष्टा करून आपली करमणूक करून घेण्याची वृत्ती जुन्या पिढीत होती. ही वृत्ती आपल्या घरात असणार नाही, याचं सामुदायिक भान संपूर्ण कुटुंबाने पाळणं आवश्यक आहे.
– ज्या गोष्टी आपण करू शकणार नाही, त्याची पोकळ धमकीही मुलांना देऊ नये. म्हणजे तू जेवला नाहीस, तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही वगैरे.. कारण असं होणं शक्य नसतं. त्यामुळे मुलांच्या लक्षात येतं की, आईवडील देत असलेली धमकी पोकळ आहे. त्यापेक्षा मी रात्रीपर्यंत तुझ्याशी बोलणार नाही, असं नेमकं बोलून आपली नाराजी व्यक्त करावी. म्हणजे मुलांना काय चूक काय बरोबर हेही कळतं आणि आई-बाबा बोलतात, ते करतातसुद्धा हा संदेशही त्यांच्यापर्यंत पोहोचतो.
– जर-तरच्या अटी पालकांनी मुलांना घालण्याची सवय लावू नये. म्हणजे अभ्यास केलास तर पाणीपुरी देईन वगैरे. कारण एकदा मुलांना कळलं की आपण पालकांच्या मनासारखं वागलो तर आपल्यालाही आवडत्या गोष्टी मिळतात. मग मुलं आपल्याला हव्या त्या गोष्टी कशा मिळवता येतील याचाच विचार अधिक करतात व सतत मोबदला मागतात. त्यापेक्षा मुलांच्या वहीवर, हातावर स्टार काढण, त्यांचं मनापासून कौतुककरणं हे योग्य.