Weather Update : काळजी घ्या! राज्यात उष्णतेची लाट, अनेक ठिकाणी तापमान चाळीशी पार..

Weather Update : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून यावेळी मोठ्या प्रमाणावर उष्णतेची लाट असल्याचे दिसून आले आहे. रविवारी महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान ४० अंश सेल्सिअस ओलांडले. सोलापूर येथे तापमान २.३ अंशांनी वाढून ४३.७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.
राज्याच्या पश्चिम आणि मध्य भागात उच्च तापमानाची नोंद झाली आहे. रविवारी बहुतांश शहरात तापमानाने ओलांडली चाळिशी- कुलाबा वेधशाळेत ३४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३८.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली. यामुळे उन्हात बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच ठाण्यात कमाल तापमान ४०.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर (४०.७), जळगाव (४२.२), नाशिक (४१.२), कोल्हापूर (४०.३), नांदेड (४२.४), पालघर (४२), परभणी (४२.८), सांगली (४१) आणि सातारामध्ये ४०.५) अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मे महिन्यात हे अजून पुढे जाण्याची शक्यता आहे.
नांदेडचा पारा गेला ४२.४ अंशांवर गेला आहे. वातावरणातील बदलामुळे उन्हाचे चटके बसत आहेत. वाढत्या उकाड्याने अंगाची लाहीलाही होत असून, रविवारी मागील चोवीस तासांत नांदेड जिल्ह्यात या वर्षातील सर्वाधिक ४२.४ सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. Weather Update
कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली आहे. रविवारी या महिन्यातील सर्वोच्च तापमान नोंदले गेलं. ४१ अंश सेल्सियस तापमानामुळे मोठा त्रास होत आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांची रात्रीची झोपही उडाली आहे.
पुण्यात आणखी तापमान वाढण्याची शक्यता- पुण्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान ४० अंशपर्यंत वाढत आहे. दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका बसत असल्याने रस्त्यांवर कमी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र घरात देखील उकाडा जाणवत आहे.