आम्हीच दहशतवादाची बीजे पेरली ! मोठ्या आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तानने केले मान्य…!


नवी दिल्ली : पाकिस्तानच्या पेशावरमध्ये मशिदीमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 90 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तसेच 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

यावर बोलताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणाले ‘भारतात किंवा इस्रायलमध्ये पूजा करणाऱ्या लोकांवर हल्ले होत नाहीत, तर पाकिस्तानात हे घडत आहे. देशाने आता दहशतवादाविरोधात एकजूट व्हायला हवी. आम्हाला आमचे घर व्यवस्थित ठेवण्याची गरज आहे.

तत्कालीन सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही, असा आरोप ख्वाजा आसिफ यांनी केला. पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप होत आहे. भारत या मुद्द्यावर जोरदार आवाज उठवत आहे.

पाकिस्तानी संसदेत बोलताना ख्वाजा आसिफ म्हणाले, मी जास्त काही बोलणार नाही, फक्त सांगू इच्छितो की आम्ही दहशतवादाची बीजे पेरली होती. असे त्यांनी मान्य केले आहे.

दरम्यान, पेशावरच्या पोलीस लाइन्स भागात असलेल्या मशिदीमध्ये मोठ्या संख्येने लोक नमाज अदा करत असताना स्फोट होता. स्फोटामुळे मशिदीचे छत उपासकांवर पडले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!