दुःखद! ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..

मुंबई : मराठी चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते. वृद्धापकाळाने त्यांचं निधन झाले.
मुंबईतील राहत्या खरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १०० हून अधिक मराठी अजरामर नाटकांमध्ये त्यांनी काम केले होते . सावरकर यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन क्षेत्रातील विविध सेलिब्रेटींनी शोक व्यक्त केला आहे.
जयंत सावरकर यांचा जन्म ३ मे १९३६ रोजी गुहागर येथे झाला.वयाच्या विसाव्या वर्षी १९५४ पासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. वयाच्या ७३व्या वर्षांपर्यंत त्यांच्या अभिनयाची कारकिर्द सुरूच राहिली.
अपराध मीच केला (गोळे मास्तर), अपूर्णांक (ब्रम्हे),अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष),अल्लादीन जादूचा दिवा (हुजऱ्या), अवध्य (नाचणे), आम्ही जगतो बेफाम (चिवटे),एकच प्याला (तळीराम) सारख्या अनेक दर्जेदार मराठी नाटकात त्यांनी काम केले. १००हून अधिक नाटकात काम करण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावे आहे.