आळंदीत आम्हाला एकांतात नेऊन मारलं, वारकऱ्यांचा आरोपाने उडाली खळबळ..


पुणे : काल पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना झाला आहे. यामध्ये आळंदीत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुरू असताना वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला. यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांना मारहाण केल्याचे सांगितले जात आहे.

मोठी बातमी! शरद पवार यांना धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक, गुन्हे शाखेची कारवाई..

याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. या घटनेवर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आळंदी येथे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही, त्यामुळे न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका. असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

सिंहगड रोडवर धारदार शस्त्राने वार करुन तरुणाची हत्या, पुण्यात गुन्हेगारी वाढली..

असे असताना आता मारहाण झालेल्या या वारकऱ्याचा व्हिडिओ हायरल होत आहे. जवळपास १५ ते २० पोलिसांनी चार वारकऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप विशाल रावसाहेब पाटील या तरुण वारकऱ्याचे केला आहे.

लाठीचार्ज झाला नाही, राजकारण करू नका, वारकऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फडणवीसांचे वक्तव्य

पोलिसांनी आम्हाला का मारले याचे उत्तर द्यावे, अशी मागणी विशाल पाटील याने केली आहे. पोलिसांनी वारकऱ्यांना बाजूला केले. मात्र काही तरुण वारकऱ्यांना बाजूला नेऊन मारहाण केली, असे विशाल पाटील याने म्हटले आहे.

आळंदीमध्ये वारकरी आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये वाद झाला. यानंतर वारकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यामध्ये काही वारकरी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!