Uruli Kanchan : उरुळीकांचन उपविभागातील वीजेचा वाढत्या दाबाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी कोण वाली नाही! वळती उपकेंद्रावर ब्रेक – डाऊनने नागरीक त्रस्त…!!


जयदीप जाधव

Uruli Kanchan उरुळीकांचन : महावितरणच्या उरुळीकांचन उपविभागातील वळती उपकेंद्राला विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिनीवर विजेचा प्रचंड दाब वाढल्याने वाहिनीचा तारा तुटून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वाढले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत सातत्याने वीजपुरवठा खंडीत होण्याचा प्रकार वाढल्याने या वाहिनीवरील शेतकरी, नर्सरी व्यावसायिक व छोटे -मोठे उद्योग व्यावसायिक चांगलेच त्रासले आहे.मात्र अनेक वर्षे उरुळीकांचन उपविभागातील वाढत्या वीज भाराचा प्रश्न निकालात काढण्यासाठी महावितरणकडून प्रयत्न होत नसल्याने विजेचा पूर्णतः हा खेळखंडोबा उडाला आहे.

 

महावितरणच्या उरुळीकांचन उपविभागातील वळती उपकेंद्रावरील विजेचा अतिरिक्त भाराचा प्रश्न अनेक वर्षे जैसेथेच आहे.या  भागात नवीन उपकेंद्रास मंजुरी नाही,वाढीव ट्रान्सफार्मर मागणी पूर्ण होत नाही, जिर्ण झालेल्या वाहिनीचे टेंडर होऊन काम पूर्ण होत नाही. अशा अवस्थेत या भागाची परिस्थिती आहे. तीव्र उन्हाळ्यात या भागात विजेची मागणी या ठिकाणी ४५० अँम्पियर पेक्षा अधिक क्षमतेने भासत आहे. अशावेळी या जिर्ण वाहिन्यांवर वाढत्या दाबाचा ताण येत असल्याने तारा तुटण्याचा मोठा प्रकार या ठिकाणी वाढत आहे.वर्षभरात ऑक्टोबर महिना व उन्हाळ्यात तीन महिन्यांत विजेचा अतिरिक्त भार या ठिकाणी निर्माण होत असल्याने परिणामी पडत असलेल्या भाराने विजेचा खंडीतपणा वाढला आहे.

वळती उपकेंद्राला वीज पुरवठा करण्यासाठी थेऊर केंद्रावरुन वाहिनी आहे. या वाहिनीवरुन कुंजीरवाडी, तरडे, सोरतापवाडी, वळती, शिंदवणे, कोरेगाव मूळ आदी गावांचा पुरवठा अवलंबून आहे. या वाहिनीवर शेती व्यवसाय , नर्सरी, तसेच घरघुती व छोटे -मोठे व्यावसाय म्हणून विजेची मागणी वाढली आहे. गेल्या काही दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने वीज पुरवठा खंडीत होण्याचा वाढला आहे. गेली १० वर्षे या भागात प्लॉटींग व्यवसाय तसेच छोटे मोठे व्यवसाय वाढल्याने वीजेची मागणी वाढली आहे. मात्र या वाढत्या समस्येला तोडगा काढण्यासाठी महावितरण हत्तीचा चालीने प्रयत्न करीत असल्याने अनेक वर्षापासून परिस्थिती जेसे थे आहे.

वरिष्ठ कार्यालय व लोकप्रतिनिधींकडून बेदखल..!!

उरुळीकांचन उपविभागाचा विजेचा कारभार हा एक ना धड बारा चिंध्या सारखा आहे. उरुळीकांचन उपविभागात हा ग्रामीण भागात मोडत आहे. परंतु या ठिकाणी गृह प्रकल्प, टाऊनशीप, प्लॉटींग, छोटे-मोठे व्यावसाय उभे राहत आहे. अशावेळी विजेची वाढत्या मागणीसाठी वीज केंद्राची आवश्यक भासत आहे. याशिवाय तात्पुरत्या उपाययोजनांसाठी ट्रान्सफॉर्मर, बायफर्गेशन करणे आवश्यक आहे. मात्र महावितरण व लोकप्रतिनिधीनी या प्रश्नात स्वारस्य दाखवित नसल्याने ग्राहकांना चटके बसत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!