उज्ज्वल निकमांनी कोर्टात वाल्मिक कराडचा डाव हाणून पाडला!! सगळी केसच फिरवली, नेमकं काय घडलं?


बीड : येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी काय घडलं याबाबत विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी माहिती दिली आहे. वाल्मिक कराडने युक्तिवाद करत असतांना आपला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात आपला हात नसल्याचे सांगत याप्रकरणी मकाको लागत नाही असं सांगितले.

असे असताना निकम यांनी याला विरोध केला. आरोपी विरोधात काय काय पुरावे आहे. त्या संपूर्ण पुराव्यांची जंत्री आम्ही न्यायालयासमोर सादर केली. त्याच प्रमाणे कटाचा मुख्य सूत्रधार कायम पडद्यामागे असतो आणि आपल्या कटपूतल्यांचे आधारे तो वाईट कृत्य करत असतो. मात्र या प्रयत्न आपण हाणून पाडला आहे.

असे निकम म्हणाले. येत्या 7 जुलैपर्यंत न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जुलै रोजी होणार असून आज कोर्टाचे कामकाज तीन तास चालले. यावेळी आरोपी वाल्मीक कराडच्या वकिलांकडून दोन तास युक्तिवाद करण्यात आला. तर उज्वल निकम यांनी एक तास युक्तीवाद केला.

यावेळी केवळ दोषमुक्ती अर्जावर युक्तिवाद झाला, अशी माहितीही आता समोर आली आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. मागील सुनावणी दरम्यान न्यायाधीश रजेवर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.

दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. हे प्रकरण राज्यात गाजत असून सध्या या आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!