आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३४ वी जयंती, महाराष्ट्रात ठिकठिकाणी जल्लोष, चैत्यभूमीवर आकर्षक विद्युत रोषणाई..


पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्ताने देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी काल १३ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता अनुयायांनी स्थानिक बुद्ध विहारांमध्ये मोठी गर्दी केली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान विकासाशी संबंधित अनेक उपक्रमांचा ते शुभारंभ करणार आहेत. तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वरळी ते वांद्रे सागरी सेतूवर लेझर लायटिंग करण्यात आले आहे. तसेच काही ठिकाणी फटाक्यांची आतेषबाजी, मिरवणुकांचेही आयोजन करत भीम जन्मोत्सवाचा जल्लोष केला जाणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती पार पडत आहे. या निमित्त वरळी ते वांद्रे सागरी सेतूच्यामध्ये लेझर लायटिंग करण्यात आली आहे. या सागरी सेतूवर एका बाजूला बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो तर दुसऱ्या बाजूला अशोक चक्र आणि संविधान यांची प्रतिकृती विद्युत रोषणाईद्वारे करण्यात आली आहे. त्याचबरोबर चैत्यभूमीमध्येही मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण महाराष्ट्रात जयंती साजरी केली जात आहे. या निमित्ताने जळगाव शहरांमध्ये तब्बल 44 मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व ठिकाणचे कार्यक्रम तसेच मिरवणूक शांततेत पार पाडाव्यात, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव दलाची एक तुकडी देखील तैनात करण्यात आली आहे. सर्वांनी आनंदात आणि शांततेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी, असे आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे .

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!