शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही!! ‘त्या’ शेतकऱ्यांना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उघडपणेच सांगितलं….


पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

केवळ खऱ्या गरजू आणि खरीप शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. “मर्सिडीज चालवणाऱ्या श्रीमंत लोकांना कर्जमाफी नाही, हे त्यांचे ठाम विधान चर्चेचा विषय ठरत आहे. हे विधान म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्काचे संरक्षण करणाऱ्या धोरणांची सुरूवात मानली जात आहे.

तसेच राज्य शासन लवकरच उच्चस्तरीय समिती गठीत करणार असून, त्या समितीच्या माध्यमातून कर्जमाफीचे निकष आणि पात्रता ठरवली जाणार आहे. महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, खोट्या नावाने कर्ज घेऊन स्वतःला शेतकरी दाखवणारे आणि प्रत्यक्षात आलिशान गाड्या, फार्महाऊस व उच्च जीवनशैली असलेले लोक हे गरीब शेतकऱ्यांच्या हक्कांवर अतिक्रमण करतात. अशा बनावट शेतकऱ्यांना या योजनांपासून दूर ठेवण्याचा सरकारचा स्पष्ट निर्धार आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हालाखीची आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे पीकनुकसान, वाढते उत्पादन खर्च, बाजारभावातील अनिश्चितता आणि अपुरा विमा संरक्षण यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.

अशा पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने शेती करणाऱ्या आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी ही एक आवश्यक मदत ठरणार आहे. बावनकुळे यांनी सांगितले की, येत्या ३ जुलै रोजी विधानभवनात मुख्यमंत्री, कृषी विभागाचे अधिकारी, आणि आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक होणार आहे.

दरम्यान या बैठकीत कर्जमाफीच्या अंमलबजावणीसंबंधी तपशीलवार निर्णय घेतले जातील. तसेच, भविष्यात कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी पात्रता निश्चितीची पारदर्शक प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!