अतिवृष्टी झाली, पंचनामे झाले, पण मदत पॅकेजमध्ये समावेश नाही, सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा…


पुणे : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने तुटपुंजी मदत जाहीर करून आधीच शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. आता जो जीआर काढलेला आहे, त्यातही अनेक त्रुटी समोर येत असून जीआर झोपेत काढलाय का? असा प्रश्न पडतो. असा सवाल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

आमदार रोहित पवार म्हणाले, राज्यभरातून अनेक तालुक्यांमधून फोन येत असून आमच्या तालुक्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, पंचनामे देखील झाले परंतु आमच्या तालुक्याचा मदत पॅकेज मध्ये समावेश नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. या संदर्भात सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.

कदाचित अनेक तालुक्यांमध्ये ठराविक गावांमध्ये किंवा मंडळांमध्ये नुकसान झाले आहे. संबंधित भागातील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा करून वस्तुस्थिती शासनाच्या लक्षात आणून द्यावी, सरकारने देखील गावे किंवा महसूल मंडळे युनिट मानून ज्या भागात पंचनामे झाले आहेत त्यांचा या पॅकेज मध्ये समावेश करावा.

तसेच सदरील पॅकेज मध्ये दुरुस्ती करत हेक्टरी 50 हजार मदत द्यावी, अशी विनंती आमदार रोहित पवार यांनी केली आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने याबाबत घोषणा करणे गरजेचे आहे. सध्या मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!