गाडीचं चाक खड्ड्यात गेलं अन् ते थेट पुलावरुन जळत्या चितेवर पडले; एक जणाचा मृत्यू

बिहार : बिहारच्या गोपालगंज येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोपालगंज कुचायकोट पोलिस स्टेशन हद्दीतील सासामुसा येथे अचानक एका दुचाकीच चाक खड्यात गेल्यामुळे अपघात झाला. त्यामुळे दुचाकीवरील एक जण पुलाखाली कोसळला.
याचवेळी पुलाखाली चिता पेटलेली होती. या अपघातात ही व्यक्ती थेट त्या चितेवर जाऊन पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. तर दुचाकीस्वार दुसरा तरुणही गंभीर जखमी झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, या गावात राहणारे वकील प्रसाद हे त्यांच्या पुतण्या शिवमसोबत बाईकवरून यूपीमधील साहेबगंज येथे पत्नीसाठी औषधं घेण्यासाठी गेले होते. पत्नीच्या हृदयविकाराचे औषध घेऊन ते घरी परतत होते. यावेळी त्यांचा अपघात झाला. अपघातांनंतर तो पुलाखाली पेटलेल्या चितेत जाऊन पडला.
जवळच उभ्या असलेल्या लोकांचं जेव्हा चितेकडे लक्ष गेलं तेव्हा त्यांना चितेमध्ये काही हालचाल होत असल्याचे लक्षात आले. यामुळे त्यांना धक्काच बसला. चितेमध्ये हालचाल कशी होत आहे. असा प्रश्न त्यांना पडला.
नंतर त्यांनी जवळ येऊन पाहिलं तेव्हा घडलेला प्रकार पाहून त्यांना धक्काच बसला. त्या चितेवर एक जिवंत व्यक्ती पडलेला होता. हा व्यक्ती अपघातामुळे याठिकाणी पडला आहे, असं त्यांच्या लक्षात आलं. त्याला लगेच तात्काळ त्या व्यक्तीला चितेतून बाहेर काढले. या घटनेत तो चांगलाच भाजला गेला होता.
दरम्यान, या घटनेत व्यक्ती चांगलाच भाजला असून त्याता सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. तसेच या घटनेत दुचाकीस्वार दुसरा तरुणही गंभीर जखमी झाला आहे.