अर्धा टन तांदळाचा मसाला भात अन् तीन टन उसाचा रस अशा गरगरीत पाऊणचाराने वारकरी तृप्त! कस्तुरी प्रतिष्ठानच्या स्वादिष्ठ अन्नदानाने वारकऱ्यांची मने जिंकली..

उरुळीकांचन : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात दरवर्षी अन्नदानातून मोठा दानशूरपणा दाखविणाऱ्या कस्तुरी प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांना यंदाच्या वर्षीही स्वादिष्ठपणाचा पाहुणदार देण्यात आला. या पाहुणचाराने विश्रांतीसाठी थकलेल्या वारकऱ्यांना मनस्वी मेजवानीने प्रतिष्ठानने तृप्त केले आहे.
कस्तुरी प्रतिष्ठानच्या मेजवणीत दानशूरपणाची व खऱ्या विठ्ठलभक्तांच्या सेवेची भूक भागविण्याची परंपरा सेवेने पूर्ण करण्यात आली आहे. अर्धा टन तांदूळाचा मसाले भात, तीन टन ऊसाचा गोड रस, पाच पोती पीठ दळून तयार गरम भाकरी व मिरची खर्डा बेताने व्याकूळ झालेल्या दहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा प्रतिष्ठानने यंदाच्या वर्षी केली आहे.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे व खजिनदार संतोष भन्साळी यांच्या माध्यमातून प्रतिष्ठान दरवर्षी पालखी सोहळ्याला हजारो वारकऱ्यांसाठी अन्नदानाची उपक्रम राबविते. यंदाच्या सोहळ्यात वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेताना परोपकारी कृतीची झलक मुक्त कंठाने वारकऱ्यांनी बोलून दाखविली आहे.