संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची उरुळीकांचन नगरीत भक्तिची उधळण! वारीचा ‘याचि देही याचि डोळी’ लाभला अनुभवायला सहवास….

उरुळीकांचन : जयदिप जाधव
!! वैकुंठ जावया तपासे सायास! करणे जीवा नाश करणे बहु !! तया पुंडलिके केला उपकार ! फेडावया भार पृथ्वीचा !! !! तुका म्हणे सोपी केली पायवाट ! पंढरी वैकुंठ भूमीवरी !!
वैकुंठाला जाण्यासाठी तपश्चर्येसारखे कष्ट करावे लागत असत ; पण भक्त पुंडलिकाने भक्तांवर उपकार केला आहे. त्याने दाखविलेल्या भक्तिमार्गाने दुर्जनांचा भार कमी झाला. तुकोबा म्हणतात,वैकुंठाची पायवाट सोपी झाली आहे ही पायवाट म्हणजे पंढरीच्या रुपाने पृथ्वीतलावर वैकुंठ आले आहे. या तुकोबांच्या अभंगाशी एकरूप होत आषाढी वारीसाठी पंढरपूरात वैष्णवांचे वैकुंठ उतरण्यासाठी पांडुरंगाच्या भेटीसाठी भक्तीरसात न्हाहलेल्या वैष्णवांचा मेळा महात्मा गांधी यांच्या पदस्पर्श लाभलेल्या उरुळीकांचननगरीत दुपारच्या दीड वाजण्याच्या सुमारास विश्रांतीसाठी विसावला होता. या नगरीत सोहळ्याचे स्वागत तरुण मंडळी व ग्रामस्थांनी नामस्मरणाचा जयघोष करीत स्वागत केले आहे.उरुळीकांचन ग्रामपंचायत, देवस्थान समितीच्या यांच्या माध्यमातून सोहळ्याचे हार ,पुष्प घालून पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
संत तुकाराम महाजाराजांच्या पालखी सोहळ्याने लोणीकाळभोरचा रविवारचा मुक्काम उरकून सकाळी सव्वा ८ च्या सुमारास यवत मुक्कासाठी प्रस्थान ठेवले. सकाळी साडेदहा वाजता थेऊरफाटा येथे सोहळ्याचे आगमन झाले. महाराष्ट्र राज्य साखर कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे , कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे, ‘यशवंत’ चे संचालक नवनाथ चौधरी, युवा नेते युवराज चौधरी आदींनी केले. त्यानंतर पालखी सोहळा कुंजीरवाडीत प्रवेश केल्यानंतर सरपंच हरिष गोठे यांनी स्वागत केले.नायगाव फाट्यावर सोहळ्याचे स्वागत सरपंच
कल्याणी हगवणे यांनी केले. तर पेठपुलावर सरपंच मोनिका श्रीकांत चौधरी यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
सोरतापवाडी फाट्यावर पालखी सोहळ्याचे स्वागत सरपंच सुप्रिया चौधरी यांनी केले. यावेळी माजी सरपंच संध्या चौधरी, पुनम आढाव , ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.पालखी सोहळ्यास सोरतापेश्वर सेवा समिती ग्रामपंचायत सोरतापवाडी तसेच सुदर्शन युवा मंचाच्या वतीने चहा नाष्ट्याचे वाटप करण्यात आले. पुरोगामी शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब चोरघे, पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी, माजी उपसरपंच गणेश चौधरी आदी उपस्थित होते.
कोरेगावमूळ ग्रामपंचायत हद्दीत सरपंच बापुसाहेब बोधे, माजी सरपंच भानुदास जेधे, मंगेश कानकाटे यांनी सोहळ्याचे स्वागत केले. शिवतेज मित्र मंडळाच्या वतीने दिलीप शितोळे, उद्योगपती संतोष गायकवाड यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर पालखी सोहळा दुपारी दिडच्या सुमारास उरुळी कांचन नगरीत विसाव्यासाठी दाखल झाला. यावेळी ज्येष्ठ नेते प्रा. के.डी.कांचन, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, पुणे बाजार समितीचे संचालक राजाराम कांचन, सरपंच मयूर कांचन, अमित कांचन, अजिंक्य कांचन, उपसरपंच स्वप्नीशा कांचन आदी उपस्थित होते.
दरम्यान उरुळीकांचन विसाव्यासाठी पालखी सोहळा उरुळीकांचन ग्रामविकास सहकारीसोसायटीच्या मोकळ्या जागेत विसावला होता. यावेळी भाविकांनी दुतर्फा रांगा लावून तुकोबांच्या पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर विविधत पादुकांची आरती संपन्न होत सोहळ्याने यवत मुक्कामासाठी दुपारी तीन वाजता प्रस्थान ठेवले.त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास हा सोहळा बोरीऐंदी येथे दाखल सोहळ्याने दौंड तालुक्यात प्रवेश केला.