पुढील दोन दिवस अतिमहत्वाचे!! हवामान विभागाने दिला महत्वाचा इशारा, जाणून घ्या..


मुंबई : राज्यात मान्सून दाखल झाला आहे. पुढील तीन ते पाच दिवसांत मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे. काल विश्रांती घेतल्यानंतर आज मुंबईच्या आकाशात मळभ साचलंय. तर मुंबईत जरी पाऊस नसला तरी गार वारा सुटला आहे.

मंबईतील कुर्ला, चेंबूर, बांद्रा या भागात पावसाची रिपरिप पाहायला मिळतेय. दरम्यान, पुढील दोन दिवस मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, पुढील काही दिवस राज्यातील समुद्र खवळणार असल्यानं किनारपट्टी भागांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. शहरात पुढील २४ तासांमध्ये आकाश ढगाळ राहील, तर उपनगरीय भागांमध्ये अधूमधून पावसाच्या सरींची हजेरी आणि मेघगर्जनाही पाहायला मिळेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!