घरच्यांनी लग्नाला नकार दिला म्हणून प्रेमी युगुलांनी घेतला मोठा निर्णय, घटनेने देश हादरला..

मुंबई : कुटुंबीयांना त्यांचे प्रेम मंजूर नव्हते. पण ते दोघे एकमेकांवाचून राहू शकत नव्हते. त्यातच तिचे लग्न ठरलं. साखरपुडाही झाला. त्यामुळे दोन जीवाची घालमेल झाली. मग एक दिवस रात्री दोघेही घराबाहेर पडले.
बराच वेळ एकत्र घालवला. एकमेकांना डोळेभरून पाहिलं. मनमोकळ्या गप्पा मारल्या. घट्ट मिठी मारली. पुन्हा पुढच्या जन्मी भेटण्याच्या आणाभाका घेतल्या. सेल्फी काढला. व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवला.
खेळाडू २५ वर्षाचा खेळवला १९ वर्षात, चौघांविरोधात बारामतीत गुन्हा दाखल
शेवटचा क्षण मनसोक्त जगले. उजाडलं तेव्हा सर्व काही संपलं होतं. तिचा श्वास थांबलेला होता. त्याचाही श्वास बंद होता. दोघांनीही जगाचा निरोप घेतला होता. अशी घटना राजस्थानच्या बाडमेरमध्ये घडली आहे. दोघांच्या घरच्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली होती. दोघेही पळून गेल्याचा त्यांना संशय होता.
देशात पुन्हा उडाली खळबळ! लिव्ह-इन पार्टनरची हत्या करत मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारिक केले, आणि
त्यामुळे रात्रभर शोध केला. त्यानंतर पुन्हा सकाळी दोघांचा शोध घेतला. खुशीची आई तिचा शोध घेत घेत गावच्या सरकारी शाळेजवळ आली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. शाळेच्या आवारातील झाडाला दोघांचेही मृतदेह लटकलेले दिसले.
बैलाने काढला सगळ्या गावकऱ्यांचा घाम! घराच्या छतावर चढला बैल अन्..
दरम्यान, शवविच्छेदनानंतर दोघांच्याही नातेवाईकांकडे मृतदेह सोपवण्यात आले. दोघांनीही प्रेमातील नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.