Big Breaking : ठाकरेंनी राजीनामा द्यायला नको होता! सत्ता संघर्षाचा निकाल शिंदे यांच्या बाजूने..


नवी दिल्ली : सत्तासंघर्षाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आता 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांकडे असणार आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

यामुळे आता राज्यात शिंदे सरकार कायम राहणार आहे. याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे कोर्टाने हा दिलासा दिला आहे.

 

उद्धव ठाकरे यांनी तो राजीनामा द्यायला नको होता. तो दिला त्यामुळे पुढील अडचणी वाढल्या आहेत. तसेच राज्याचे सत्तासंघर्ष प्रकरण आता 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे देण्यात येणार आहे. यावर आज मोठा निकाल आला आहे.

 

यामध्ये व्हीप फक्त राजकीय पक्ष देऊ शकतात. असेही सरन्यायाधीशांनी म्हटले आहे. अध्यक्षांनी या प्रकरणाची चौकशी करायला हवी होती, भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे देखील म्हटले आहे. यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!