असत्याचा आधार घेऊन फडणवीस असं वक्तव्य करतील,असं वाटलं नव्हतं : शरद पवार


मुंबई : देवेन्द्र फडणवीस व अजित पवार यांनी भल्या पहाटे सरकार स्थापन करून महाराष्ट्राला धक्का दिला होता. ते अजित पवार यांनी केलेले बंड होते व पुरेसे संख्याबळ न झाल्याने फसले असे आजवर मानले जात होते. पण आज स्वत: देवेन्द्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या संमतीनेच सरकार स्थापले होते असा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिल्यानंतर आता शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

23 नोव्हेंबर 2019 रोजी झालेला हा पहाटेचा शपथविधी तीन वर्षानंतर पुन्हा चर्चेत आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या गौप्यस्फोटानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खुलासा केला आहे.

शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी केल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. एवढंच नव्हे तर खाते वाटप आणि महामंडळांच्या वाटपाबाबतही शरद पवारांशी चर्चा करण्यात आली होती असंही फडणवीस म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यानंतर अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी पुन्हा चर्चेत आला आहे. शरद पवार यांनी यावार खुलासा करताना देवेंद्र फडणवीस यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस खोटं बोलत असल्याचे म्हंटले आहे. असत्याचा आधार घेऊन फडणवीस असं वक्तव्य करतील, असं वाटलं नव्हतं, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत व्यक्ती आहेत. ते असं वक्तव्य करतील, असं कधी वाटलं नव्हतं. तुम्ही या आरोपांबाबत त्यांनाच विचारा असं शरद पवार म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!