शिवसेना अन् धनुष्यबाण कुणाचा ?; आज निर्णय होणार ?


नवी दिल्ली : शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा ? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात युक्तिवाद पूर्ण झाला आहे, मात्र, ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. यावर लेखी म्हणणं मांडण्याची मुदत आज संपल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग आज निकाल देण्याची शक्यता आहे.

राज्यातील सत्ता संघर्ष हा सध्या सुप्रीम कोर्टात सुरू आहे. शिवसेना फूटीनंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यामध्ये शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहे. यामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून शिवसेना पक्षासह चिन्हाची मागणी केली जात आहे. सुप्रीम कोर्टासह निवडणूक आयोगात दोन्ही गटाकडून म्हणणं मांडले जात आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष हे आजच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लागून आहे. निवडणूक आयोगासमोर आज दोन्ही गट लेखी म्हणणं मांडणार आहे. प्रत्यक्ष युक्तिवादानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.हे. ३० जानेवारीला कोणत्याही गटाचा तोंडी युक्तिवाद होणार नाही. ३० तारखेपर्यंत दोन्ही गटांना गरजेनुसार लेखी म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले होते. दरम्यान, शिंदे गट आज लेखी उत्तर सादर करणार आहे. निवडणूक आयोगाचा फैसला कोणाच्या पारड्यात जाणार, याबाबतची राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!