Satara News : साताऱ्यात अखेर तीन दिवसांनी इंटरनेट सेवा सुरू, इंटरनेटसाठी अनेकांनी जिल्हा बद्दलल्याची चर्चा सुरू…

Satara News सातारा : जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळीमध्ये रविवारी झालेल्या दोन गटामधील तणावानंतर अजूनही परिस्थिती तणावाखाली आहे. कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी गावामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Satara News)
जिल्ह्यातील संपूर्ण इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती, ती अखेर तीन दिवसानंतर चालू करण्यात आली. मात्र यादरम्यानच्या काळामध्ये जिल्ह्याच्या कडेच्या भागात असलेले तालुक्यांमधील हजारो लोकांनी अक्षरशः या तीन दिवसात जिल्हे बदलले होते.
सातारा जिल्ह्यातील (Satara News) पुसेसावळी भागात सोशल मीडियावर महापुरुषांची बदनामी केल्याच्या कथित संशयावरून दंगल उसळली. या घटनेनंतर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केली होती.
त्याचप्रमाणे सोशल मीडियावर कोणीही अफवा पसरवली, तर त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देखील पोलिसांनी दिला होता. यादरम्यानच्या काळामध्ये अनेकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
सोशल मीडियापेक्षा सध्या विविध भरती परीक्षा आणि भरती प्रक्रिया सुरू आहेत, या पार्श्वभूमीवर अर्ज भरणे, विविध माहिती घेणे यातही परीक्षार्थींची मोठी ससेहोलपट झाली, तर शासकीय दाखल्यांसाठी महा-ई-सेवा केंद्र व इतर ठिकाणी जाणाऱ्यांची ही मोठी धावपळ उडाली. ज्यांना अतितातडीचे दाखले हवे होते, त्यांची मोठी गैरसोय झाली.
त्यामुळे अनेक जणांनी या दरम्यानच्या काळामध्ये आपल्याकडेच्या इतर जिल्ह्यांमध्ये इंटरनेटसाठी आसरा घेतला होता. फलटण तालुक्यातील अनेक जण बारामती तालुक्यातील सांगवी भागात दिसत होते, तर माळशिरस तालुक्यातही अनेक जणांनी जाऊन आपली कामे करून घेण्याचा प्रयत्न केला. तोच प्रकार खेडशिवापूर आणि इतर भागातही दिसून आला.
दरम्यान, पुसेसावळी तणाव दरम्यान, पुसेसावळी तणाव प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ३४ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यामधील १५ जणांना वडूज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे