कदमवाकवस्तीचे सरपंच भरविणार ‘सरपंच जनता दरबार’ ; चित्तरंजन गायकवाड यांचा आनोखा प्रयोग चर्चेत…!


उरुळी कांचन : मतदारसंघात थेट नागरीकांना आपल्या समस्यांसाठी व्यासपीठ मिळावे म्हणून जनता दरबार ही संकल्पना जिल्ह्यातील काही आमदार व खासदार हे प्रभावीपणे राबवित असतात. मात्र गावच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार कुठल्या सरपंचांनी भरविले आहे काय ? हे तुम्ही पाहिले आहे कायं ! आता हीच जनता दरबार संकल्पना थेट गावात राबविण्याचा निर्णय कदमवाकवस्तीचे सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी घेतला आहे. ते रविवारी गावातील लोकांची समस्या जनता दरबार भरवून सोडविणार असल्याने हवेली तालुक्यात या पॅटर्नची चर्चा जोरात सुरू झाली आहे.

कदमवाकवस्तीचे सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी “ग्रामपंचायत कदमवाकवस्तीतील समस्या तुमची, सोडविण्याची जबाबदारी आमची” या संकल्पनेतून सरपंच जनता दरबाराचे आयोजन आठवड्यातील प्रत्येक रविवारी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत केले आहे. सरपंच गायकवाड यांच्या निवास्थानी या जनता दरबाराचे आयोजन केले आहे. नागरिकांना कामे सोडून सुट्टी काढून ग्रामपंचायतीशी निगडीत कामांसाठी ग्रामपंचायतीत हजर रहाणे शक्य होत नाही. हा विचार करून आपल्या नागरिकांच्या सेवेसाठी व समस्यांचे निवारण करण्यासाठी प्रत्येक रविवारी हा जनता दरबार घेण्यात येणार आहे.

दरम्यान, या जनता दरबारामध्ये ७/१२ उतारे, ८ अ उतारे, घरांच्या नोंदी, रहिवासी दाखले, व्यवसायासाठी दाखले, रेशनकार्ड, प्रभागातील समस्या व प्रश्न, वैयक्तिक कामे, सार्वजनिक विकासकामे, ग्रामपंचायत सतरावरील सर्व कामे केली जाणार आहेत. ज्या नागरिकांनी मागणी केलेले ग्रामपंचायतीमधील दाखले सोमवारी घरपोहोच देण्यात येणार असल्याचेही गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

सरपंच चित्तरंजन गायकवाड म्हणाले, “नोकरी करणाऱ्या नागरिकांना सुट्टी काढून ग्रामपंचायतीशी निगडीत कामांसाठी ग्रामपंचायतीत हजर रहाणे शक्य होत नाही. तसेच सर्वसामान्य लोकांसाठी या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच नोकरी करणाऱ्या नागरिकांनी रविवारी एखादा दाखल्याची मागणी केली असता त्या नागरिकाला हा दाखला सोमवारी घरपोहोच देण्यात येणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!