कारखाना नीट चालवा नाहीतर माझ्याशी गाठ आहे, सही करून बाहेर फिरायचं असेल तर राजीनामा द्या आणि फिरत बसा….


बारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये अजित पवार यांनी विरोधकांना मोठा धक्का दिला. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकहाती सत्ता घेत 21 पैकी 20 जागा जिंकल्या. यानिमित्ताने आज अजित पवार यांनी आभार मेळावा घेतला. यावेळी त्यांनी संचालकांना तंबी दिली.

ते म्हणाले, कारखाना नीट चालवा नाहीतर माझ्याशी गाठ आहे. कोणाला सही करून बाहेर पडायचे असेल तर त्याने राजीनामा देऊनच फिरावे. कामाच्या वेळेत कामच केले पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी अजित पवार यांनी अनेक विषयांवर गौप्यस्फोट देखील केले. शरद पवार गटाला देखील दोन जागा देतो असे सांगितले होते.

असे असताना मात्र त्यांचा काही निरोप आला नाही. ज्यावेळी माझ्या लक्षात आले की, मला पॅनलच करावा लागेल, त्यावेळीही माझ्या मनात कुठेही मला संचालक किंवा अध्यक्ष व्हायचे नव्हते. मात्र माझ्या पॅनल मधील अध्यक्ष पदासाठी सहा ते सात लोक चेअरमन पदासाठी इच्छुक होते. असेही अजित पवार म्हणाले.

त्यामुळे मला माझेच नाव पुढे करावे लागले, मी कितीही त्यांना पदे दिली की तेवढ्यापुरती असते दादा दादा करतात. मात्र पुढाऱ्यांनी जरी काहीही केले, तरी बारामतीला सर्वसामान्य माणूस माझ्या पाठीशी आहे, मग माझ्या नावाने विचार केला, असेही अजित पवार म्हणाले. माळेगावच्या निवडणुकीडे राज्याचे लक्ष लागले होते.

आता तुम्ही कारखाना बघा आणि नंतर बघा मी कसा बदल करतोय. कारखाण्याचा एकही रुपया न वापरता मी सगळं करून दाखवतो, असेही त्यांनी सांगितले. राज्यात आपण चांगला दर देणार असल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!