Rohit Pawar : मोठी बातमी! रोहित पवार यांनी केला मोठा दावा, अजित पवार गटाचे २२ आमदार शरद पवारांकडे परतणार…

Rohit Pawar : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु असून, अजित पवार गट प्रचंड नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहे. अशात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी मोठा दावा केला आहे.
अजित पवार गटाचे २२ आमदारांना शरद पवारांकडे परत यायचं आहे. तर, १२ आमदारांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली पाहिजे असे वाटत असल्याचे रोहित पवार म्हणाले आहेत. जागावाटपात अजित पवारांना अपेक्षित जागा मिळत नसल्याने राष्ट्रवादीत नाराजी असल्याची चर्चा सुरु असतानाच रोहित पवारांनी हा दावा केला आहे.
रोहित पवार पुढे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात वाद होणारच होता. त्याबरोबरच भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात देखील वाद सुरू झाला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या पक्षात मोठी खदखद असून, बऱ्याच लोकांना बीजेपीच्या चिन्हावर निवडणूक लढायची आहे. तसंच अजित पवारांच्या पक्षातील बऱ्याच आमदारांना देखील भाजपच्या चिन्हावर लढायचं आहे. Rohit Pawar
ज्यात १२ आमदारांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. तर, २२ आमदारांना पुन्हा एकदा शरद पवारांकडे परत यायचं आहे. त्यामुळे हा वाद हळूहळू वाढत जाणार आणि यात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह अजित पवारांच्या पक्षाचे नुकसान होणार असल्याचं रोहित पवार म्हणाले आहे.