मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, मराठ्यांना कायद्यातील चौकटी राहून आरक्षण..!!

ठाणे : राज्यभरात मराठा आंदोलनाचा मुद्दा पेटलेला आहे. आता काहीही झाले तरी येत्या २० जानेवारीला आम्ही मुंबईत येणारच आहोत अशी स्पष्ट भूमिका मनोज जरांगे यांनी केली आहे.यावर अजित पवार यांनी भाष्य केले आहे. काहीजण मुंबईत येण्याची भाषा करीत आहेत परंतु कुणीही कायद्यापेक्षा मोठा नाही असे अजित पवार यांनी इशारा दिला आहे.
अजित पवार पुढे म्हणाले , आरक्षण देताना ते कायद्याच्या चौकटीत बसले पाहिजे. ते बसत नसेल तर हट्ट करून चालणार नाही.त्याच्यावर काही पर्याय निघतो का ते शोधले पाहिजे.
आरक्षण प्रश्न सोडविण्याचा
प्रयत्न सरकार करीत असून इतर आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची काळजी घेतली जाईल. सध्या ६२ टक्के आरक्षण असून यात ओबीसी, एस. टी. एस. सी. सह ५२ टक्के आरक्षण तर १० टक्के आरक्षण हे आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार देश चालत आहे, कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल, त्याचा मुलायजमा ठेवला जाणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांना पवारांनी दिला.
दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ता मेळावा कल्याण – मुरबाड रोडवरील वरप या गावी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी बोलताना मनोज जरांगे पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. काहीजण मुंबईत येण्याची भाषा करीत आहेत. परंतु कुणीही कायद्यापेक्षा मोठा नाही असे अजित पवार म्हणाले आहेत.