औरंगजेबाची कबर काढून समुद्रात नेवून फेका, गुणरत्न सदावर्ते यांचे वक्तव्य…

औरंगाबाद : वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल खुलताबाद येथील औरंगजेब कबरीला भेट दिली. असे असताना यावर गुणरत्न सदावर्ते यांनी नाव न घेता असदुद्दीन ओवैसी, प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
सदावर्ते म्हणाले, औरंगजेब, अजमल कसाब हे देशात कधीच प्रेरणा व वैचारिक स्थान होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे अमेरिकेच्या लष्कराने ओसामा बिन लादेन याचे प्रेत मध्य समुद्रामध्ये फेकले होते त्याचप्रमाणे अशा प्रवृत्तीच्या लोकांची कबर देखील समुद्रत नेऊन फेका.
यामुळे वारंवार कोणी या कबरीवर पुष्प अर्पण करणार नाही. देशातील लव जिहाद पेक्षा व्हाॅट्सअप जिहाद अधिक भयंकर असल्याचेही ते म्हणाले. यामुळे आता यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
संगवी, ओसामा बिन लादेन, दाऊद अशा विचारांची माणसे परदेशात बसून हे व्हाट्सअप ग्रुप चालवत आहेत. यामुळे देशामध्ये विघटन करणारी शक्ती वाढली आहे.
देशात यांचे कोणाशी लागेबांधे आहेत, याची चौकशी करा, अशी मागणी देखील सदावर्ते यांनी केली. यामुळे सध्या याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.