उन्हाळा संपताच अंड्याच्या दरात विक्रमी वाढ, श्रावणात गगनाला भिडणार भाव? १२ अंड्यांसाठी मोजा इतके रुपये….

पुणे : श्रावणात चिकन, मांस, अंडी अनेकांसाठी वर्ज्य असते. त्यामुळे अनेक जण श्रावणापूर्वीच त्यावर तुटून पडतात. एक महिना श्रावण पाळावा लागत असल्याने अनेक जण ऐन आषाढातच चंगळ करतात. पण अंडी प्रेमींची चिंता वाढली आहे, कारण अचानक अंड्यांचे भाव वधारले आहेत.
याच मागणीचा फटका ग्राहकांच्या खिशाला बसतोय. पोल्ट्री व्यवसायावर बर्ड फ्लू, अधिक उष्मा आणि वाहतूक अडथळ्यांचा तिहेरी परिणाम झाल्याने बाजारात अंडी महागली आहेत. राज्यात सध्या अंड्यांचा दर ठिकठिकाणी ७८ ते ९० रुपये डझनवर पोहोचला आहे.
मुंबईतील लोखंडवाला परिसरात ९० रुपये, वांद्रे आणि बोरीवलीत ८० रुपये, तर वसईत ७८ रुपयांना अंडी विकली जात आहेत. ऑनलाईन खरेदीदारांना चेंबूर, कांजुरमार्गसारख्या भागात तब्बल ११७ रुपये डझन दर मोजावा लागत आहे. स्पेशल अंड्यांचा बॉक्स सहा नगांसाठी ५७ रुपयांवर गेला आहे.
तसेच उन्हाळ्यात लातूर, धाराशीवसारख्या जिल्ह्यांत बर्ड फ्लूच्या प्रकरणांमुळे अनेक कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली. शिवाय अधिक उष्णतेमुळेही पक्ष्यांच्या मृत्यूची संख्या वाढली. यामुळे अंड्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं आहे. ब्रेडकाफ्टचे सुरेश पासवान सांगतात, “उष्म्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. नव्या पिल्लांना अंडी घालायला वेळ लागतो.
श्रावण आल्याने आता उन्हाळा संपल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर दुसरीकडे अंड्यांच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात दर ७८ ते ९० रुपये डझनपर्यंत पोहोचले आहेत. मार्चमध्ये मुंबईत १०० अंडींसाठी घाऊक दर ४७० रुपये होता, तो जूनच्या अखेरीस ५९१ रुपये इतका झाला आहे.
दरम्यान, अधिक उष्म्यामुळे पक्ष्यांच्या मृत्यूमुळे उत्पादन घटले आणि पावसाळ्यात वाहतुकीतील अडथळ्यांमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली, असे पोल्ट्री व्यवसायिकांचे म्हणणे आहे. लोखंडवाला येथे अंडी ९० रुपये, वांद्रे आणि बोरीवलीत ८० रुपये, तर वसईत ७८ रुपय दराने विकली जात आहेत. ऑनलाइन खरेदीदारांना चेंबूर आणि कांजुरमार्ग येथे ११७ रुपये डझन दर मोजावा लागत आहे. सहा ‘स्पेशल अंडी’च्या बॉक्सची किंमत ५७ रुपये अथवा त्यापेक्षा अधिक आहे.