Raj Thackeray : नरेंद्र मोदी यांना पाठिंबा का दिला…राज ठाकरे यांनी दिले स्पष्टीकरण, म्हणाले…


Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एमआयजी क्लबमध्ये शनिवारी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला? यासंदर्भातील कारण राज ठाकरे यांनी सांगितले.

भूमिका बदलणे आवश्यक होते, असे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मोदींना पाठिंबा देण्याबाबतच विश्लेषण सभेतचे केलं. पंतप्रधान मोदींचं नेतृत्व खंबीर असल्याने पाठिंबा दिला. मोदी नसते तर राम मंदिर उभे राहिले नसतं. १९९२ पासूनची मागणी पूर्ण झाली.

राम मंदिर मोदींच्या काळात पूर्ण झाले हे वास्तव आहे, असे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देण्यावर दिले आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडवा सभेत महायुतीला पाठिंबा दिला.

राज ठाकरे यांनी यावेळी म्हंटले आहे की, गुडी पाडवा मेळाव्यात मी सांगितलं मनसेचा नरेंद्र मोदी यांना पाठिंबा आहे. पहिल्या पाच वर्षात आम्हाला त्यांचा भूमिका पटल्या नाहीत, तेव्हा टीका केली होती. Raj Thackeray

टीका केली तेव्हा काय मागितले नव्हते, पूर्वीच्या मुद्यांवर टीका होती. महाराष्ट्राबाबतच्या मागण्या मोदींपर्यंत पोहचतील, आम्ही भूमिका बदलतो म्हणतात, पण आमच्या भूमिका या मुद्यांवर आहेत, असे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिले आहे.

पाच वर्षात काही बदल झाले, त्यामुळे त्यांच्या भूमिकेचे स्वागत ही केलं आहे. राम मंदिर निर्माण, ३७० कलम असे अनेक निर्णय चांगले पंतप्रधानांनी घेतले. पाठिंबा देताना मला पक्षाचा विचार करावा लागतो.

ज्यांना ही भूमिका पटत नाही, ते निर्णय घ्यायला मोकळे आहेत, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे. राजसाहेबांनी भूमिका बदलल्याचं सांगत मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. त्यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!