राज्यातून गायब झालेला पाऊस कधी कमबॅक करणार.? हवामान खात्याने दिले महत्त्वाचे संकेत…

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पाऊस गायब झाला आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तर काही ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. आता ऑगस्ट महिना सुरु झाल्यापासून पावसाने पाठ फिरवली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वचजण पावसाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता दिलासादायक बातमी आहे. आता
हवामान खात्याकडून 18 ते 24 आणि 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच विदर्भातील काही भागात पावसाचा जोर कायम राहील. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोकणात पावसाचे आगमन होईल. तर दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात सरासरी पाऊस होऊ शकतो.
सध्या राज्यात अनेक ठिकाणी
पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांसमोर पिके कशी वाचवायची हा प्रश्न पडला आहे. राज्यातील बहुतांश भागात अजूनही पुरेशा प्रमाणात पाऊस पडला नाही. यामुळे शेतकरी टेन्शनमध्ये आहे.
जर येत्या काळात अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांवर खूप मोठे संकट येईल. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. अनेकांच्या पेरण्या यामुळे राहिल्या आहेत.