राज्यावर पावसाचं संकट! 24 तास धोक्याचे, प्रशासनाने केला मोठा अलर्ट जारी…

मुंबई : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून पावसाने थैमान घातलं आहे.आता अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने यलो अलर्ट आणि ‘हाय अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईमध्ये पुढील 24 तासांसाठी हलका ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुढील एक ते दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस सुरू राहणार असून नंदुरबार, जळगाव, धुळे, आहिल्यानगर रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे पालघर या भागात पाऊस होणार आहे. फक्त राज्यच नाही तर देशातील अनेक भागांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आलाय. आंध्रप्रदेशात मोंथा चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे.
सततच्या पावसाने शेतकऱ्यांवर घाला, कापणी केलेल्या धानालाच अंकुर फुटले आहेत. आता अवकाळी पावसाने शेतकरी हतबल झाले आहेत.

दरम्यान जालना जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी अनुदानाच्या मदतीपासून अद्यापही वंचित आहेत. दिवाळीनंतरही शेतकऱ्यांच्या खात्यावर जाहीर केलेल्या मदतीचा एकही रुपया न आल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे..

