Pune : घरात स्वयंपाक सुरू असताना गरम पाणी अंगावर पडले, दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना…


Pune : गरम पाण्याने भाजून बालिकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथून समोर आली आहे. या घटनेने बालिकेच्या कुटुंबियांवर दुःखाचा दुःखाचा डोंगर कोसळा आहे.

ऋतिका राहुल उमाप (वय दीड वर्ष, रा. जातेगाव बुद्रुक, ता. शिरूर) असे मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, जातेगाव येथील अनिता उमाप या घरात स्वयंपाक करत असताना त्यांनी भाजी बनवण्यासाठी पाणी तापवून ठेवले होते. Pune

यावेळी ऋतिका या दीड वर्षीय बालिकेने गरम पाण्याचे भांडे ओढून घेतल्याने ती भाजली गेल्याने तिच्यावर शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करून नंतर घरी नेण्यात आले. Pune मात्र, त्यांनतर अचानक ऋतिका बेशुद्ध पडल्याने तिला उपचारासाठी शिक्रापूर येथे आणले.

दरम्यान, यावेळी डॉक्टरांनी ऋतिकाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले, याबाबत राहुल सुभाष उमाप यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार गणेश करपे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!