रांजणगाव तिहेरी हत्याकांडाचा अखेर पुणे ग्रामीण पोलिसांकडून छडा ! बहिणीच्या दिरानेच लग्नासाठी दोन लहानग्या चिमुकल्यांसह वहिणीच्या बहिणीला संपविले…..


पुणे : पुणे -नगर महामार्गालगत असलेल्या रांजणगाव गणपती हद्दीत खून करुन जळलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या तिहेरी खून प्रकरणाचा अखेर पुणे ग्रामीण पोलिसांना उलगडा करण्यात यश आले आहे. बहिणीच्या दिरानेच लग्न करण्यास नकार दिल्याने दोन चिमुकल्या बाळांचा व महिलेचा गळा दाबून दगडाने ठेचल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचा उलगडा झाला आहे.

आरोपी गोरख पोपट बोखारे (वय ३६ वर्षे सध्या रा. सरदवाडी ता. शिरूर जि पुणे मुळ रा. चिखली, ता. श्रीगोंदा जि अहिल्यानगर) असे तिहेरी खूनप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रांजणगाव हद्दीत दोन चिमुकल्यांसह एका स्त्रीचा अर्धजळीत मृतदेह आढळल्याने यि घटनेने पुणे जिल्हा हादरून गेला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तपासात बारकावे शोधत अखेर तब्बल पंधरा दिवसांनी गुन्ह्याचा छडा लावला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव गणपती (ता. शिरूर जि. पुणे) गावच्या हद्दीत असलेल्या ग्रोवेल कंपनी शेजारी लक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे निर्जन ठिकाणी दोन चिमुकल्यांसह एका स्त्रीचा अर्धजळीत मृतदेह आढळून आला होता. स्त्रीचे वय अंदाजे 25 ते 30 वर्ष, एक मुलगा वय अंदाजे तीन ते चार वर्षे व एक मुलगा वय अंदाजे एक ते दोन वर्ष असे आहे. या तिघांना प्रथम हत्याराने जीवे ठार मारण्यात आले आणि पुरावा नष्ट व्हावा यासाठी जाळून टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. या घटनेतील मृतदेहांची ओळख पटलेली असून मृत महिला स्वाती केशव सोनवणे (वय २५ वर्षे रा. वाघोरा, ता माजलगाव जि बीड) विराज आणि स्वराज दोन मृत मुले येथील असून आरोपी गोरख पोपट बोखारे (वय ३६ वर्षे सध्या रा. सरदवाडी ता. शिरूर जि पुणे मुळ रा. चिखली, ता. श्रीगोंदा जि अहिल्यानगर) हा बहिणीचा दीर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दि.२३ मे रोजी आरोपी गोरख पोपट बोखारे याने त्याचेकडील मोटार सायकलवर मृत स्वाती सोनवणे व तिची दोन्ही मुले स्वराज आणि विराज यांना आळंदी येथून घेवून सरदवाडी (ता. शिरूर) येथे जात असताना रात्रीचे वेळी रांजणगाव गणपती गावचे हद्दीतील पुणे-नगर हायवेरोडलगत बंद असलेल्या ग्रोवेल कंपनी पासून खंडाळे गावाकडे जाणारे कच्या रोडलगत मोटार सायकल थांबवून तिने केलेल्या लग्नाचे मागणीला विरोध करायचा म्हणून स्वाती व तिचे दोन्ही मुलांचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला व पेट्रोल टाकून जाळून टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

घटना घडलेल्या दिवशी पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी घटनास्थळी भेट देऊन तत्काळ घटनेच्या तपासासाठी सहा पथके चोवीस जिल्ह्यात रवाना करण्यात आली होती. रांजणगाव एमआयडीसी आणि पुणे ग्रामीण पोलिस यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र ‘पुलिस के हाथ लंबे होते है’ या उक्ती प्रमाणे तिहेरी हत्याकांड गुन्ह्याची उकल करून आरोपीला अटक केली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार बारामती विभाग, एस.डी.पी.ओ. प्रशांत ढोले, शिरूर विभाग, मा. एस.डी.पी.ओ. बापूराव दडस, दौंड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पो. स्टे चे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्यासह पथकाने या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला अटक केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!