Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज कालवा समितीची महत्वाची बैठक, पाणीवाटपाबाबत होणार चर्चा


Pune News पुणे : यंदा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील पानशेत आणि वरसगाव ही प्रमुख धरणेच १०० टक्के भरली आहेत. इतर धरणांमध्ये पाणीसाठा कमी आहे.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार Ajit Pawar  यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी म्हणजे आज (ता.२०) रोजी होणार्‍या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शहराच्या पाण्याचा निर्णय होणार आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. Pune News

महापालिकेला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या (एमडब्ल्यूआरआरए) नियमाचा दाखला देत जलसंपदा विभागाने १२.८२ टीएमसी पाणी मंजूर केले आहे. त्यापेक्षा जास्त पाणी वापरल्यास दंड आकारण्याचा इशाराही दिला आहे.

या पार्श्वभूमीवर कालवा समितीची बैठक होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधार्‍यांना शहर आणि ग्रामीण भागाला समान पाणीवाटप करताना कसरत करावी लागणार आहे.

यंदा शेतीसाठी किती पाणी मिळणार आणि ते केव्हा मिळणार यावर देखील या बैठकीत चर्चा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी देखील ही बैठक महत्वाची आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून कालवा समितीचे इतर सदस्य देखील उपस्थित राहणार आहेत. यामुळे आपल्या तालुक्याला जास्तीक जास्त पाणी मिळण्यासाठी सगळे आमदार देखील प्रयत्नशील आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!