Prithviraj Chavan : राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली, देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी..


Prithviraj Chavan राज्यात कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरुन पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

राज्यात सध्या विविध भागात गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. या घटनावरुन विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका करताना दिसत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत विरोधक सरकारवर प्रहार करत आहेत. अशातच आता पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. Prithviraj Chavan

काँग्रेससाठी मराठवाड्यात चित्र फार चांगलं आहे. संविधान बचामुळं सर्वच दलित समाज हा महाविकास आघाडीकडून आहे. चारशे पारची घोषणा तुम्हीच केली सर्व घोषणा तुम्हीच करत आहात. त्यामुळं लोकांच्या नजरेत त्या गोष्टी येतात. चारशे पारची घोषणा म्हणजे संविधान बदलण्याच्या भूमिकेत येणे असा त्याचा अर्थ होतो आणि ते आम्ही खपवून घेणार नाही असे चव्हाण म्हणाले.

महायुतीला देशातील आरक्षण हे रद्द करायचा आहे. मोहन भागवत मागे एकदा बोलले होते की आरक्षण आता भरपूर झाले आणि बस झाले आहे. त्याच दिशेने तुम्ही पावलं टाकत आहात अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!