Prakash Ambedkar : ६ डिसेंबरनंतर राज्यात दंगली होणार, प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यामुळे उडाली खळबळ..


 Prakash Ambedkar : राज्यात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. तीन डिसेंबरनंतर राज्यात दंगलीची मोठी शक्यता आहे. पोलीस ठाण्यांना सतर्कतेची सूचनाही देण्यात आली आहे. चार राज्यांतील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर काहीही होऊ शकते, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हणाले.

यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका निशाणा साधला. ते म्हणाले की, राज्यात ६ डिसेंबर नंतर काहीही होऊ शकते अशा सूचना पोलिसांना आल्या आहेत. पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना आल्या आहेत, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. Prakash Ambedkar

गेल्या नऊ वर्षात मुस्लिम समाजाने अत्याचार सहन केला आहे. लोकसभा निवडणुकीला चार महिने राहिले आहेत. येत्या लोकसभेला बदल नक्की होणार आहे, सरकार कोणाचे येईल सांगता येत नाही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी नसणार आहे, असंही आंबेडकर म्हणाले.

तसेच देशात सध्या धार्मिक हस्तक्षेप होत आहे, आमच्या वैदिक धर्मावर आघात होत आहे, असा ज्यांनी कांगावा केला होता त्यांनी आता देशात हिंदूंचे राज्य असून देशाला हिंदूराष्ट्र करावे, संबोधित करावे, असा नवीन कांगावा केला आहे. तर दुसरीकडे देशालील संविधान बदलणार अशा घोषणा केल्या जात आहेत, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे.

लोकल पोलिसांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. येत्या काही दिवसात राज्यात दंगली घडू शकतात, असे सांगितले आहे, असंही आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, छगन भुजबळ यांना तुरुंगातून मीच बाहेर काढले आहे. त्यांनी या बद्दल माझे आभार मानले नाहीत, तरीही मी नाराज नाही, असंही आंबेडकर म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!