Politics News : भाजपचे अच्छे दिन गेले, आता काँग्रेसला येणार अच्छे दिन, महायुतीतील नेत्यांसह १४०० जणांनी मागितली उमेदवारी…

Politics News : लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत आघाडी घेतली त्यानंतर काँग्रेस मधील नेत्यांसह महायुतीतील नेत्यांचाही काँग्रेस पक्षावर विश्वास वाढला आहे.
कारण विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील चौदाशे जणांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत आघाडी घेतली.
आता काँग्रेसमधील नेत्यांसह महायुतीच्या नेत्यांचाही पक्षावर विश्वास वाढलेला आहे. कारण दोन महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील १४०० जणांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. यामध्ये महायुतीच्या नेत्यांचाही समावेश आहे.
यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले की, विधानसभेसाठी तिकीट वाटप मेरिटच्या आधारावरच होईल. ते म्हणाले, “लोकसभेच्या निकालानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे.
आम्हाला इच्छुक उमेदवारांकडून हजारो अर्ज प्राप्त होत आहेत, परंतु आम्ही हे स्पष्ट केले आहे की उमेदवारी मेरिटनुसार दिली केली जाईल. यासह इतर पक्षातील प्रमुख नेतेही आमच्या सोबत येण्यास उत्सुक आहेत. Politics News
दरम्यान, २०१४ मध्ये आधी केंद्रातून काँग्रेसची सत्ता गेली आणि नंतर त्यांनी महाराष्ट्रही गमावले. अशात गेल्या १० वर्षांत पक्षाला राज्यात खूप कठीण काळातून जावे लागले. या काळात झालेल्या काही निवडणुकांमध्ये तर उमेदवारही मिळत नव्हते. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर परिस्थिती बदलल्याचे पाहायला मिळाले.
लोकसभेत काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष झाल्यानंतर विधानसभेतही सर्वात मोठा पक्ष होण्याचे अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केले जात आहेत. त्यामुळे अनेकजण काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.